नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश तालुक्याचे आ.सुहास आण्णा कांदे यांनी दिले आहे. नांदगाव तालुक्यात शनिवारी गारपीट व अवकाळी पाउस झाला, या पावसात अनेक शेतकर्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने २१ गावातील २४०० हेक्टर क्षेत्रावरील गहू, मका, कांदा या पिकांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे गहू पिकाचे तसेच रांगडा व उन्हाळी कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग सहा दिवसांपासून पाचही महसूल मंडळात अवकाळी पाऊस पडत आहे.या मुले शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून घेणे गरजेचे असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. या प्रसंगी शेतकर्यांनी धीर सोडू नये असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











