loader image
[ays_poll id=7]

नांदगाव / मनमाड बाजार समिती निवडणुक कार्यक्रम जाहीर

Mar 21, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाने राज्यातील बहुचर्चीत अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला असून त्यानुसार नांदगाव व मनमाड बाजार समितीची निवडणूक २८ व ३० एप्रील रोजी होणार असून नेमक्या कोणत्या तारखेला कुठली निवडणूक होईल हे येत्या २७ मार्चला निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करणार आहे.

नांदगाव व मनमाड बाजार समितीच्या निवडणूकी साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २७ मार्च ते ३ एप्रील पर्यत मुदत आहे .छाननी ५ एप्रील रोजी होणार असून वैध नामनिर्देशन ६ एप्रील रोजी प्रसिद्व होणार आहे. तर नामनिर्देशन पत्र ६ एप्रील ते २० एप्रील पर्यंत मागे घेता येतील . निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची वैध यादी जाहीर करूण २१ एप्रील ला चिन्ह वाटप होणार आहे.
यानंतर तालुक्यातील एका बाजार समितीची निवडणुक २८ एप्रील रोजी तर दुसऱ्या बाजार समितीची ३० एप्रील रोजी होईल व त्यानंतर लगेचच मतमोजणी होईल .
गेल्या ९ महिन्यातील राजकीय घडामोडी चा विचार करता शिवसेना शिदें गट व भाजपा विरूद्व महाविकास आघाडी यांचात सरळ लढत होईल . अशी सद्याची राजकीय परिस्थीती आहे.
आज दोन्ही बाजार समितीवर प्रशासकीय राजवट असली तरी दोन्ही बाजार समितीवर आ. सुहास कांदे यांचे वर्चस्व होते . आता होणाऱ्या निवडणूकी साठी आ. कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा दोन्ही बाजार समितीची सत्ता हस्तगत करण्यासाठी सरसावली आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील माजी आ. जगन्नाथ धात्रक,पकंज भुजबळ,अनील आहेर,संजय पवार,राजेद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढेल असे चित्र आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.