loader image
[ays_poll id=7]

अंकाई रेल्वे मालधक्क्यावर औष्णिक विद्युत केंद्रातून येणाऱ्या राखेमुळे शेतकरी व कांदा लोडींग करणाऱ्या व्यापाऱ्याचें मोठे नुकसान

Mar 23, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

मनमाड जवळ असलेल्या अंकाई रेल्वे स्थानकावर मालधक्क्यावर औष्णिक विद्युत केंद्रातील राख मालवाहतूक गाडीतून आणली जाते. प्लॅटफॉमवर खाली होते, नंतर ती तेथून अन्यत्र ट्रक द्रवारे नेली जाते.मात्र गाडीतून राख उतरविल्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर हवेने उडत असल्याने परिसरातील शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होते. राखेमुळे या भागातील नागरिकांना जगणे मुश्किल झाले होते. या ठिकाणी कांद्याची लोडिंग होत असल्याने राखेमुळे कांद्याच्या प्रतवारी परिणाम होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे दाखल होताच त्यांनी तात्काळ त्याची गंभीर दखल घेत, स्वीय सहाय्यक प्रवीण रौदळ यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. व रेल्वे विभागाशी बोलून अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार रौदळ यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रेल्वेचे अधिकारी , ग्रामस्थ व व्यापारी वर्गाची संयुक्त बैठक घेऊन कैफियत जाणून घेतली. या बैठकीचा अहवाल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना सादर करणार असून लवकरच मंत्री डॉ. भारती पवार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी व रेल्वेमंत्री यांच्याशी संपर्क साधून अंनकाई किल्ल्या रेल्वे स्थानकावर राख न उत्तरविण्याबाबत सूचना करणार आहे. यावेळी डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहायक प्रविण रौदळ , कारटींगएजंट संजय वडनेरे, कांदा व्यापारी सुनील देवरे, सुशील संकलेचा,भाजप नांदगाव तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, रेल्वे वाणिज्य विभागाचे बी.एल.मीना, श्री. कुंभार , ग्रामस्थ अलकेश कासलीवाल, तुषार आहिरे,बाळासाहेब बोराडे, जिवृत्ती घुमरे, अशोक घुमरे, कृष्णा घुमरे,रमेश घुमरे, किशोर बोराडे, बाळू घुमरे, ज्ञानेश्वर घुमरे, उत्तम घुमरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.