loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाडच्या वीणाताई आहेर ने स्थापित केला राष्ट्रीय विक्रम, पटकाविले सुवर्णपदक

Mar 24, 2023


बेंगलोर येथे सूरु असलेल्या चौथ्या महिला मानांकन राष्ट्रिय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई संतोष आहेर हिने क्लिन जर्क मध्ये नवीन राष्ट्रिय विक्रम स्थापित करीत सुवर्णपदक पटकावले.
५७ किलो स्नॅच व ७४ किलो क्लिन जर्क असे १३१ किलो वजन उचलून विनाताई आहेर हिने सुवर्णपदक व रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवित आपल्या सलग तिसऱ्या राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक व राष्ट्रिय विक्रम करीत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ७१ किलोचा आकांक्षा व्यवहारे चा राष्ट्रिय विक्रम मोडीत काढत ७४ किलोचा नवीन राष्ट्रिय विक्रम प्रस्थापित केला आहे तसेच १३१ किलो एकूण वजन उचलण्याच्या राष्ट्रिय विक्रमाचीही बरोबरी करीत मनमाड शहराचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रिय स्तरावर झळकावले.

 

 

 

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर,संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ पोतदार,एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.