loader image
[ays_poll id=7]

शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याची फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

Mar 31, 2023


शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला असुन अपघाताचे प्रमाण वाढले आहे व रस्त्याने जाणे येणे वयोवृध्द व लहान मुलांना भितीयुक्त वातावरण झाल्याने जनावरांचा व मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करून लोकांच्या जिवाला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
ब-याच ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण केल्याने दुचाकी गाडया भरधाव वेगाने धावत आहेत व त्यामुळे अपघाताचे प्रमाणे वाढलेले आहे. लोकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. मोक्याच्या ठिकाणी तसेच चौकाचौकात रेडीमेड स्पिड ब्रेकर बसवुन वाहतुक सुरळीत करावी
तसेच शहरात प्रमुख ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावून अपघात तसेच चोरी व अन्य गुन्हेगारी संबधा योग्य त्या फुटेजवरुन अचुक महिती मिळून नागरीकांच्या सुविधेत मोलाची भर घालता येईल.
मालेगाव नाका, पेट्रोलपंप समोरील चौफुलीस माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.श्री. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नावाचा मोठा पथदर्शक
फलक लावावा तसेच पाकीजा चौक एफसीआय रोडकडे जा
रस्ता येथे शहीद अ. हमीद रोड दर्शक स्पष्ट व आकर्षक फलक
लावण्यात यावेत.
ब-याच वर्षांपासून सावित्रीबाई फुले मंडई अत्यन्त दयनीय व अस्वच्छ अवस्थेत असल्याने त्याबाबत लवकरात लवकर स्वच्छता करुन लोकांसाठी उपयोगात आणावे.
आय.यु.डी.पी येथील पंधरकर यांच्या घरासमोरील मैदानात उद्यान तयार करून ज्येष्ठ नागरीक व बालकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करुन देउन सदरच्या प्रस्तावित उद्यानाला राजमाता जिजाउ उद्यान असे नाव द्यावे.

दिनांक ३०.०९.२०२२ रोजीच्या आमच्या पत्रान्वये ज्या ज्या ठिकाणीचे स्ट्रीट लाईट बंद झाले आहेत ते सर्व त्वरीत चालु करण्याची व आवश्क ठिकाणी नविन पोल बसविण्याची त्वरीत कार्यवाही नगरपरिषद प्रशासनाने करून मनमाड कर नागरिक बंधू भगिनींना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.