loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजार सामिती निवडणूकीत १७ नामनिर्देशन अवैध

Apr 6, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी १४८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते त्या अर्जाची छाननी आज बुधवार रोजी  करण्यात आली असून छाननीत   १३१ अर्ज वैध ठरविण्यात आले. तर १७ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. यात माजी आ. अँड अनील आहेर यांचे पुतणे अँड अमोल आहेर यांचे सोसायटी गट व ग्रामपंचायत गट या दोन्ही गटातील फॉर्म अवैध ठरविण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण १४८ अर्ज दाखल करण्यात होते. त्यापैकी १३१ अर्ज वैध ठरविण्यात आले तर १७ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.यामध्ये सोसायटी सर्वसाधारण गटातून हेंबाडे वाल्मीक ,समाधान जाधव, तर अँड अमोल आहेर. यांचे फॉर्म अवैध ठरले तर ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून सुनिल सोनवणे,सचिन जेजूरकर दिगंबर भागवत समाधान जाधव ,वाल्मीक हेंबाडे ,अँड अमोल आहेर ज्योती सुर्यवंशी रुपाली दराडे, आश्र्विनी जाधव ,सुरेखा पवार ग्रामपंचायत  आर्थिक दुर्बल गटातून भगवान देशमुख दिपक खैरनार ग्राम.प. अनु.जाती/ जमाती मच्छिंद्र पठाडे ग्रामपंचायत विमुक्त जाती वाल्मीक हेंबाडे हे सर्व अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधीकारी प्रताप पाडवी सहा .निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब आहिरे यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र ६ एप्रील ते २० एप्रील पर्यंत मागे घेता येतील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची वैध यादी २१ तारखेला जाहीर करणार आहेत. त्याच दिवशी चिन्हाचे वाटप होणार आहे . माघारीपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात किती?उमेदवार निवडणुकीत राहतात..यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून रहाणार आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.