loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

Apr 8, 2023


मनमाड ता ८ :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात भीमोत्सवाला सुरवात झाली असून ,भीमोत्सव आयोजन समितीच्यावतीने महामानवांची जयंती विचारांची जयंती साजरी करण्यासाठी इंडियन्स ग्रुपच्या चौकाचौकात पथनाट्य सादर करून आवाहन करण्यात येत आहे.

भीमोत्सव आयोजन समितीचे राजेंद्र पगारे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पथनट्याला सुरवात करण्यात आली. जयंती कशी साजरी करावी, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येत आहे. या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भीमोत्सव समितीचे निमंत्रक दिनकर धिवर, अमोल खरे, संजय कटारे, निलेश वाघ, डॉ. जालिंदर इंगळे, संतोष बळीद, मयुर बोरसे, माधव शेलार, उमाकांत राय, रामदास पगारे, सचिन शिरूड, मायकल आहिरे, फिरोज शेख, राजू पवार, कादिर शेख, आम्रपाली निकम, संजय भालेराव, सुशांत केदारे, योगेश म्हस्के, श्रीकृष्ण पागरे, सुरेश आहिरे, पुंडलिक कचरे, किशोर कदम आदींसह आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीपर्यंत पथनाट्याच्या माध्यमातून चौकाचौकात भिमोत्सवाच्या निमित्ताने शाहीरी जलसा,एकपात्री प्रयोग,व्याख्यान अशी विचारांची मेजवानी असणार आहे.

 

 

 


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.