loader image
[ays_poll id=7]

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या अर्थशास्त्र विभाग, आयक्यूएसी आणि जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसाची व्याख्यानमालेचे उद्घाटन

Apr 14, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या वतीने सामंजस्य करार अंतर्गत शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र मंठा यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 14 एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान पंधरा दिवसाची ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. याचे उद्घाटन आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर चे प्र कुलगुरू गुरु डॉ.संतोष तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देविदासराव गोरे, अध्यक्ष जनाबाजी संस्था त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुनील नरवडे प्रोफेसर अर्थशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कारकीर्द त्यांचे सामाजिक आर्थिक राजकीय कार्य यांचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार मूल्यांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असे प्रतिपादन केले.
या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र तसेच देशभरातून अनेक प्राध्यापक विद्यार्थी नागरिक, कनिष्ठ आणि वरिष्ठ उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कुलसचिव तसेच कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने हजर होते. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सहयोगी संस्थेकडून प्रास्ताविक संचालिका विजया पाटील यांनी केले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले तर इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका कविता काखंडकी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.