loader image
[ays_poll id=7]

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी साठी ४० उमेदवार

Apr 20, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या निवडणुकीत एकूण १४८ अर्ज दाखल होते. त्यापैकी १७ अर्ज छाननीत बाद झाले तर १३१ अर्ज वैध ठरले. असले तरीही आज माघारीच्या दिवसा अखेर ९१   उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली असून ४०  उमेदवार आपले नशिब अजमावणार आहे.
ओ. बी. सी गटातील अटीतटीची व तुल्यबळ होणार या जागेसाठी आ. सुहास कांदे गटाकडून माजी सभापती विलासराव आहेर विरूद्व महाविकास आघाडीकडून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक अमित बोरसे (पाटील ) या दोन तुल्यबळ उमेदवारात होणार असल्याने संपुर्ण तालुक्याचे लक्ष या लढती कडे लागले आहे .

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी   
सोसायटी  सर्वसाधारण गटातून –  सदगीर एकनाथ ,पाटील कैलास, पाटील समाधान , नंद दिलीप,  वाघ शिवाजी ,काळे धोंडीराम. आहेर दर्शन, सुर्वे हरेश्वर, इपर विजय, बोगीर समाधान , पगार साहेबराव, नहार अमित, गरुड जीवन, बोरसे सतिष,सोनवणे भाऊसाहेब 
महिला गटातून – काकळीज मंगला , कवडे अलकाताई  , वाबळे चंद्रभागा, पगार बेबीबाई, 

इ मा.व.गटातून विलासराव आहेर , बोरसे अमित 

भटक्या विमुक्त जागेसाठी सानप पोपट ,आव्हाड सुरेश
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून- वाघ अनिल, राठोड संतोष, खैरनार दिपक, पाटील अर्जुन, पवार उदयराव, जाती/जमाती ग्रामपंचायत अनु.- सोनवणे भाऊसाहेब, जाधव अशोक  सोनवणे अनिल, -आर्थिक दुर्बल गटातून- चव्हाण विजय मोरे दिपक
व्यापारी गटातून- कलंत्री यज्ञेश , नावंदर अमोल ‘कोठारी गोकुळ, खैरनार मुकुंद, सानप संजय
हमाल मापारी गटातून- कासार भास्कर इपर निलेश
निवडणूक रिंगणात आहे.

  माजी सभापती तेजदादा कवडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची  मानले जात आहे .
आ. सुहास कांदे यांच्या पॅनल च्या विरोधात महाविकास पुरस्कृत असे दोन पॅनल तयार झाले असून निवडणूक तुल्यबळ होणार असे जाणकारांचे मत आहे .


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.