राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भविष्यात शिक्षणाच्या बदल्या न करण्याबाबत विचार सुरु आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.
मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या थांबवलेल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आगामी काळात शिक्षकांच्या बदल्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, ”माध्यमिक शाळेमध्ये एका शाळेत आयुष्यभर शिक्षक शिकवत असतात. चांगल्या दर्जाचे विद्यार्थी निर्माण करत असतात. फक्त सरकारी शाळेत बदल्या होतात. यातच या बदल्या करने योग्य आहे की नाही? याच्यावर विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.









