loader image
[ays_poll id=7]

आजपासून लागू झाले हे महत्वाचे पाच बदल – जाणून घ्या

May 1, 2023


भारतात सोमवार 1 मे 2023 पासून 4 मोठे बदल लागू झाले आहेत. या बदलांचा परिणाम थेट देशातील नागरिकांच्या खिशावर होणार आहे. जाणून घ्या हे बदल

1. व्यावसायिक सिलेंडर झाले स्वस्त

भारतात सोमवार 1 मे 2023 पासून 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 171 रुपये 50 पैसे स्वस्त झाला आहे. आता 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 856 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात एलपीजी पुरवठादार कंपन्यांनी बदल केलेला नाही.
दरकपात केल्यानंतर मुंबईत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 808 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 960 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. दिल्लीत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1 हजार 856 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे. चेन्नईत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2 हजार 21 रुपये 50 पैसे या दराने उपलब्ध आहे.
2. ATM ट्रान्झॅक्शन फेल झाले तर लागणार चार्ज

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. पीएनबी ग्राहकाच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे त्याचे एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले तर संबंधित ग्राहकाला दंड लागू होणार आहे. प्रत्येक अशा स्वरुपाच्या फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनसाठी दहा रुपये दंड अधिक जीएसटी एवढा मोठा एकूण दंड लागू होईल. पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना मेसेजद्वारे या बदलाची माहिती कळवण्यात आली आहे. बँकेच्या वेबसाईटवर नोटीस प्रसिद्ध करून या बदलाची माहिती देण्यात आली आहे. हा बदल सोमवा 1 मे 2023 पासून लागू झाला आहे.
3. टाटा मोटर्सच्या कारच्या किंमतीत बदल

कार विक्रीच्या बाबतीत सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने सर्व कार मॉडेलच्या किंमतीत 0.6 टक्के वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आउडीने क्यू थ्री आणि क्यू थ्री स्पोर्टबॅक यांच्या किमतीत 1 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तसेच क्यू 8 सेलिब्रेशन, RS5 आणि S5 या कारच्या किंमतींमध्ये आउडी कंपनी 4 लाख रुपयांपर्यंत वाढ करणार आहे.

4. ग्राहकांच्या पैशांआधारे नवी बँक गॅरेंटी नाही घेऊ शकणार ब्रोकर

स्टॉक ब्रोकर आणि क्लीअरिंग मेंबर ग्राहकांच्या पैशांआधारे नवी बँक गॅरेंटी घेऊ शकणार नाही. आधीच दिलेली अशा स्वरुपाची गॅरेंटी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत संपुष्टात येईल.

5. 7 दिवसांत अपलोड करावी लागेल पावती

ज्या कंपनीचा एकूण कारभार (उलाढाल / टर्नओव्हर) 100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या कंपनीला सोमवार 1 मे 2023 पासून त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे इनव्हॉईस हे इनव्हॉईस रजिस्ट्रेशन पोर्टल अर्थात आयआरपीवर 7 दिवसांच्या आत अपलोड करणे बंधनकारक आहे. आधी अशी डेडलाईन नव्हती. जे टॅक्स पेअर नियमाचे पालन करतील त्यांनाच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल.


अजून बातम्या वाचा..

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम  स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या स्वच्छ...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आज मनमाड मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी...

read more
.