मनमाड ता.१२. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
आजच्या काळामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे विचार तरुणांनी आत्मसात करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रत्येक तरुणाने या दोन विभूतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या विकासात भर टाकली पाहिजे.
भारताला सशक्त व समृद्ध बनवायचे असेल तर स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्येक युवकाने आत्मसात केले पाहिजे आजची तरुण पिढी सोशल मीडिया व व्यसनाधीनतेकडे गुरफटत चालली आहे. आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत साकार करायचा असेल तर स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे डॉ. निकम यांनी प्रतिपादन केले.
वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. युवराज भामरे यांनी स्वामी विवेकानंद तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रीमती सुरेखा निकम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन दिला.
याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, प्रा. पी. के. बच्छाव, विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पी. व्ही. अहिरे यांनी केले.
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –
आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...











