loader image
[ays_poll id=7]

भास्कर कदम यांच्या नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे ह्या दोन पुस्तकांचे २५ मे रोजी प्रकाशन

May 12, 2023


नांदगाव ते लंडन (प्रवास वर्णन) व उजेड पेरायचा आहे (कविता संग्रह) या भास्करराव कदम यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन, दि. २५ मे २०२३ गुरुवार रोजी सायंकाळी ५.०० वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह नाशिक; येथे समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.

ग्रंथाली प्रकाशन, मुंबई या महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रकाशन संस्थेतर्फे सदर दोन्ही पुस्तकांची निर्मिती करणेत आली आहे. 

 पत्रकारितेचा मूळ पिंड असल्याने जे पाहिले, जाणवले, अनुभवले ते नांदगाव ते लंडन या पुस्तकात कदम यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच उजेड पेरायचा आहे हा सामाजिक जाणीव असलेला कवितांचा संग्रह आहे.

भास्कर कदम यांनी नांदगाव शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच स्वतःचे समर्पित नावाचे सामाजिक चळवळीला वाहिलेले साप्ताहिक ही त्यांनी चालविले आहे. याचबरोबर ४५ वर्षे विविध दैनिकाच्या माध्यमातून पत्रकारिता केली आहे. व्यापक जनसंपर्क व समताधिष्टीत सहिष्णू समाजभान हे कदम यांच्या लेखनाचे मूळ प्रेरणाश्रोत आहे. 

 प्रकाशन समारंभास आपण उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती 

-भास्कर कदम

(पत्रकार तथा माजी नगराध्यक्ष नांदगाव) यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.