loader image
[ays_poll id=7]

मनमाडकरांची “गोदावरी” पुन्हा सुरू करा ; अन्यथा जनआंदोलन

May 17, 2023


मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस कोविड काळापासून रेल्वे प्रशासनाने बंद करून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. अनेक निवेदने देऊन शेवटी रेल्वे प्रशासनाने पर्यायी गाडी सुरू केली, सुरुवातीला सी एस टी पर्यंत धावणारी ही गाडी नंतर दादर पर्यंत करण्यात आली. काही महिन्यांनंतर आठवड्यातून तीन दिवस आणि आता तर ही गाडी धुळ्याहून सुरू केल्याने मनमाड हून रोज नाशिक येथे जाणारे चाकरमानी आणि विद्यार्थी यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गाडीत असलेली तोबा गर्दी मुळे रोज प्रवाशांमध्ये वाद होत असून त्यामुळे तिकीट काढूनही येथील चाकरमान्यांना जागा मिळत नसल्याने रोजच भांडणाचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या हाल-अपेष्टांचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशी संघटनेसह लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही गाडी मनमाडहन सोडली जात नसल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात संतापाची लाट निर्माण होत आहे.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.