loader image
[ays_poll id=7]

वीरशैव लिंगायत समाजाच्या मौक्षभुमी च्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न

May 17, 2023


नांदगाव शहरातील वीरशैव लिंगायत / जंगम/ गवळी समाज बांधवांच्या मागणी नंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ समाजासाठी मौक्षभुमी च्या ( स्मशानभूमी) संरक्षक भिंतीसाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन आज सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना सोमनाथ घोंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले, आमच्या समाजाची २५ वर्षापासूनची मागणी आज पुर्ण झाली . आमचा समाज संख्येने कमी असल्याने आमच्या समाजाकडे कोणीही लक्ष दिले नाही . पण आमदार सुहास कांदे यांनी आमच्या मागणी तात्काळ पूर्ण केल्याचा आम्हाला मोठा आनंद होत आहे, तसेच या ठिकाणी लाईट व पाण्याची व्यवथा नसल्याने तशी मागणी अंजूमताई याच्या कडे करताच त्यांनी संरक्षण भितीचे काम होताच लाईट व पाण्याची व्यवस्था त्वरीत करू असे आश्वाशन दिले . आम्ही सतत आण्णांच्या पाठीशी होतोच’ आणि या पुढेही राहू असे मत या वेळी सोमनाथ घोंगाणे यांनी व्यक्त केले.
यावेळी सौ. अंजूमताई कांदे यांचा सत्कार सौ. सुचीत्रा जंगम ‘ सौ. मनीषा जंगम’ सौ. रोहीणी जंगम यांनी केला
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहिनीताई मोरे, भावराव बागुल, रोहित काकळीज , सोमनाथ घोंगाणे, वैजीनाथ जंगम, शिवलींग जंगम, बाळू जंगम , गणेश जंगम, शुभम जंगम, तान्हाजी जंगम, कैलास जंगम, सतीष जंगम, विकी जंगम, तुषार जंगम, मुकेश जंगम, अरूण जंगम, छगन अप्पा गवळी ‘ सुशील औषीकर, राहूल पिरनाईक, राजू काटकर सर, अर्जुन गवळी, भटू औशीकर, अशोक पंगूडवाले, विश्वनाथ उचे, कैलास उचे, सुनील औशीकर, विश्वनाथ उचे, मगन ऒशीकर, तुकाराम गवळी, लहानु झारकंडे, गंगा ओशीकर
श्रीमती लिलाबाई जंगम , सौ. कमलबाई जंगम, सौ. सुचीत्रा जंगम, शिवकन्या जंगम,मनीषा जंगम, प्रिती जंगम, रोहीणी जंगम आदी समाज बधू भगिणी उपस्थित होत्या .


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.