loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी – रविवारी मनमाडला मोर्चा

May 18, 2023


जाहिर निषेध – जाहिर निषेध – जाहिर निषेध

एक लढा हक्काच्या गोदावरी एक्सप्रेससाठी

आम्ही सर्व मनमाडकर….

मनमाड जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस मनमाडकरांची जिवनवाहीनी बेकायदेशिर रित्या बंद केल्याबाबत…

रविवार दि. २१ मे २०२३ सायंकाळी ५.३० वाजता..

विराट मोर्चा

समस्त जनतेच्या जनहिताची लढाई

रेल्वे प्रशासन नासिक जिल्ह्यातील प्रवाशांवर वांरवार अन्याय करत आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुय्यम वागणुकिमुळे मनमाड करांची जिवनवाहिनी गोदावरी एक्सप्रेस करोना काळापासुन बंद ठेवण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाला व लोक प्रतिनिधींना प्रवाशी संघटनेकडुन वेळोवेळी निवेदन देण्यात आली होती परंतु प्रशासनाकडुन व लोकप्रतिनीधीकडुन कोतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नव्हते.. म्हणुन प्रवासी संघनेत मा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्याजनहित याचिकेमुळे रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्सप्रेला पर्याय म्हणुन मनमाड ते सी.एस.एम.टी समर स्पेशल गाडी सुरू करण्यात आली होती. परंतु समर स्पेशल सुध्दा दुसऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतीनिधींच्या दबावामुळे धुळे स्थानकातुन सुरु करून मनमाड करांची फसवणुक केली आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करूण प्रवासी संघटनेने मोर्चेचे आयोजन केले आहे तरीही मनमाड मधिल सर्व जनतेला आव्हाण करण्यात येत आहे कि, मनमाडच्या हक्काची जिवनवाहिनी गोदावरी एक्सप्रेस वाचवण्यासाठी या विराट मोर्चामध्ये जास्तीत जास्त संखेने उपस्थित रहावे हि नम्र विनंती.


अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
.