loader image
[ays_poll id=7]

रस्त्यावरील गोर-गरिबांच्या दुकानांवर कारवाई केल्यास,वंचित बहुजन आघाडी छेडणार आंदोलन

May 19, 2023


मनमाड :-मनमाड नगर परिषदेतर्फे बुधवार दिनांक 17/05/2023 रोजी रस्त्यावर दुकाने, हातगाडी लावणाऱ्या गोर-गरिबांना अतिक्रमण निष्कासित बाबतची नोटीसी देण्यात आलेल्या असून सदर नोटीसीत अतिक्रमणे 3 दिवसात काढुन घ्यावे असे कळविले आहे.
परंतु रस्त्यावर असे छोटे मोठे, व्यवसाय करून आपले व आपल्या परिवाचे उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरिबांवर अतिक्रमण कारवाई का,?
मनमाड शहरात मोठे मोठे इमारती ज्यांनी बांधकाम परवानगी पेक्षा अधिकचे बांधकाम केले आहे, असे पक्के बांधकाम अतिक्रमण नाही का? मनमाड नगर परिषद त्यांच्यावर पक्के अतिक्रमण निष्कासित कारवाई करणार का?

मनमाड शहरातील पाणी टंचाई मुळे परस्थिती अशी की दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्या ही दुष्काळात तेरावा महिना म्हणावे की मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरिबांवरच अतिक्रमण कारवाईच्या नोटीशी देण्यात आल्या आहेत.

मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरिबांवर अतिक्रमण कारवाई केली गेली तर त्यांचे उदरनिर्वाह उध्वस्त होऊन त्यांचे परिवारातील लोकांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होणार आहे, या हुकूमशाही पद्धतीची कारवाई मुळे गोरगरिबांना आत्महत्ये शिवाय पर्याय उरणार नाही, तरी रस्त्यावरच्या कोणत्याही दुकानावर अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी मनमाड नगर परिषदेची राहील, असा ईशारा वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटी तर्फे देण्यात आला, निवेदनावर, जिल्हा सचिव कादीर शेख, शहर उपाध्यक्ष गणेश एळींजे, शकील शेख, राकेश पगारे, जफर सैय्यद,पंकज आंबोळे, अमोल केरे, शकील शेख, पापा पठाण, दुकानदार बांधव, रफिक अत्तार, समीर अत्तार गणेश कासार, बादशाह अत्तार, सलीम अत्तार, भगित्रीबाई कासार, इम्तियाज अत्तार, अमजद अत्तार, जगदीश हादगे, अकील अत्तार, शमुना अत्तार, विलास देवरे, अल्ताफ अत्तार, शबाना अत्तार, ललित पाटणी, आदींचे निवेदनावर स्वाक्षरी आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.