मनमाड शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मालेगाव नाका येथील कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती.
मनमाड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पटेल,पाणीपुरवठा विभागाचे काजवे व संबंधित अधिकारीसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
याप्रसंगी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या. सद्यस्थितीत शहरात साजरे होत असलेले समारंभ व इतर अत्यावश्यक बाबींसाठी योग्य ती पावती घेऊन पाणी उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
पाण्याचे आवर्तन हे पूर्ण क्षमतेने व संपूर्णपणे मिळवण्यासाठी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्याना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाया जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी व्हॉल्वमन यांनाही ह्या बैठकीत सूचना करण्यात आल्या.
बैठकीस उपस्थित सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गास नागरिकांची गैरसोय होऊ नये व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून सूचना केल्यानंतर लवकरच मनमाड शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत होणार आहे.














