loader image
[ays_poll id=7]

नांदगाव भुमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार – शिवसैनीकांनी लावले टाळे

Jun 13, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील तालुका भुमीअभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराला कंटाळून त्रस्त नागरिक आणि संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सोमवार (दि.१२) रोजी उप अधिक्षक भुमीअभिलेख च्या कार्यालयाला सायंकाळी सुट्टी च्या वेळी टाळे ठोकल्याने   उपअधिक्षक श्रीमती योजना अकोलकरसह इतर  कर्मचारी कार्यालयात अडकले होते. तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांच्या मध्यस्थीनंतर येत्या तीन दिवसांत बैठक बोलवून चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भुमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे आमदार सुहास कांदे यांनी देखील आंदोलन केले होते. तरीही कामकाजात सुधारणा झाली नसुन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतरही मनुष्यबळाच्या तुटवड्याची कारणे देत काम लांबणीवर टाकले जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. आजपर्यंत मोजणीची १७० प्रकरणे शिल्लक आहेत. वारंवार चकरा मारूनही मोजणी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोणत्याही प्रयोजनासाठी जमिनीचा वापर होणार असेल, तर त्या जमिनीचा मोजणीशी संबंध येतो. जमीन मोजणीचे काम भूमिअभिलेख विभागाद्वारे केले जाते.
जमीन मोजणीची प्रकरणे तातडीने किंवा कमीत कमी कालावधीत निकाली निघणे गरजेचे आहे. परंतु, त्यासाठी ही प्रकरणे कोणत्या कारणांनी प्रलंबित राहतात, तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सेवा हमी कायद्याचा प्रभावी वापर होणे गरजेचे असून,  प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी या विभागाने ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यायला हवा, अशी अपेक्षा आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी भूमिलेखच्या उप अधीक्षक श्रीमती योजना अकोलकर यांच्यासह मुख्यालय सहाय्यक ज्योती चव्हाण ‘ शिरस्तेदार दत्ता सोनवणे नागरे मॅडम पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील ‘ राजू मोरे यांनी आंदोलन कर्त्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी येत्या तीन दिवसात भूमी अभिलेखचे अधिकारी तहसीलदार आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणाबाबत चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले तसेच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून कामांचा निपटारा करावा जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही असेही कर्मचाऱ्यांना सुनावले. संबंधित कार्यालय भव्य अशा प्रशासकीय संकुलात स्थलांतरित करावे आणि याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करावा शक्य तितकी मदत महसूल विभागाकडून आपणास करण्यात येईल असे सांगितले. सुमारे सव्वा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे राजाभाऊ देशमुख, मजूर फेडरेशन अध्यक्ष प्रमोद भाबड, सुनील जाधव,,डॉ. सुनील तुसे, चंद्रशेखर कवडे, राजाभाऊ पवार, नुतन कासलीवाल, सागर हिरे, नंदु पाटील, कपिल तेलुरे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.