loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

Jun 17, 2023


मनमाड – येथील कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज’ या नावाने ११ वी १२ वी चे ज्युनियर कॉलेज सुरू झाले असून मनमाड शहरात सर्व शाखा इंग्रजी माध्यमात असणारे पहिलेच कॉलेज ठरले आहे.

ज्युनियर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेसाठी शासन परिपत्रकाप्रमाणे प्रवेशप्रक्रिया दि. १४ जून २०२३ पासून सुरू झालेली असून दहावी उत्तीर्ण विदयार्थ्यांनी ११ वी प्रवेशनोंदणीसाठी के. आर. टी. हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती दर्शविल्याने प्रवेशासाठी विदयार्थ्यांची झुंबड उडाली आहे.

११ वी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी आमची सर्व तयारी झाली असून विदयार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी योग्य शैक्षणिक अर्हता व अनुभवसंपन्न शिक्षकवृंदासोबतच डिजिटल क्लासरूमचा प्रभावी वापर याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आवश्यकतेप्रमाणे द्विभाषेची सोय सुध्दा उपलब्ध करून सुलभ पध्दतीने इंग्रजीतून शिक्षणाची व्यवस्था दिली जाणार असल्याचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी स्पष्ट केले आहे. इ. १० वी च्या १०० टक्के निकालाची परंपरा असणा-या या शाळेत कला व वाणिज्य शाखेला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आयटी विषय निवडण्याची संधी उपलब्ध असून आयटी विषयासाठी स्वतंत्र संगणककक्ष व व्यवस्थेसोबतच मोफत ग्रंथालय व स्वतंत्र स्टडीरूमची व्यवस्था देखील आहे.

कला व वाणिज्य शाखेत देखील उत्तम करियर संधी उपलब्ध असल्याने त्या शाखेत प्रवेश घेणा-या विदयार्थ्यांना इंग्लिश स्पिकींगसाठी मिसर सरांचे फिनिक्स स्पोकन क्लासेस मोफत दिले जाणार आहे.

प्रवेश शासनाच्या परिपत्रकातील नियम व गुणवत्ता यादीप्रमाणे होणार असून प्रवेशासाठी कार्यालयात किंवा कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या प्रवेशप्रमुखांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.