loader image
[ays_poll id=7]

ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

Jun 25, 2023


आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेना या पक्षाचे युवासेना तालुका उपप्रमुख राहुल सांगळे तसेच डायमंड ग्रुपचे संस्थापक सचिव दीपक केदारे, आय्याज शेख, चेतन अडांगळे, सागर साबळे, चेतन वाडीले, अरबाज पठाण, योगेश भालेराव, आकाश शिंदे, दशरथ जाधव, सागर भडांगे, विशाल वाघ, अक्षय पगार, राहुल कलवर, योगेश तासकर, प्रतीक भडले यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विकास कामांचा धडाका, प्रत्येक कार्यकर्त्यांशी, सामान्य नागरिकांशी आपुलकीची वागणे, अडचणींमध्ये खंबीर साथ देणे, तसेच आपल्या कार्यकर्त्यां सोबत असलेला जिव्हाळ्याचे संबंध पाहता मतदार संघातील अनेक पदाधिकारी आकर्षित होत असून शिवसेना पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल सांगळे तसेच डायमंड ग्रुपचे दीपक केदारे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, ज्ञानेश्वर कांदे, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, मा.नगरसेवक अमजद पठाण, पिंटू शिरसाठ,राकेश ललवाणी, वाल्मीक (आप्पा) आंधळे, अमीन पटेल ,वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ ,रुग्ण कल्याण समितीचे दिनेश घुगे, निलेश ताठे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, अमोल दंडगव्हाळ,प्रवीण नागरे, धनंजय आंधळे,सचिन दरगुडे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.