loader image
[ays_poll id=7]

नगर परिषदेच्या मालकीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरच्या नावावर व्यावसायिकाने केलेले अतिक्रमण न हटवील्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Jul 1, 2023


मनमाड शहरातील पालिकेच्या मालकीचे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरवर असलेल्या बाबासाहेबांच्या नावाची विटंबना करून शॉपिंगमधील दुकानदारांनी नावावर अतिक्रमण केले आहे. सदर प्रकार निषेधार्थ असून पालिकेने यावर तातडीने कारवाई करत नावावर असलेले अतिक्रमण काढावे. नव्याने ठळक अक्षरात नाव टाकले जावे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते अतुल वानखेडे यांनी पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. मनमाड हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पूनित झालेले शहर आहे. त्यामुळे मनमाड नगर पालिकेच्या वतीने आझाद रोडवर असलेल्या शॉपिंग सेंटरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सदर शॉपिंग सेंटर व्यावसायिक असल्याने तेथे व्यापाऱ्यांना गाळे देण्यात आलेले आहे. मात्र सदर गाळेधारकांनी आणि विशेषतः गुरुकृपा ड्रायफ्रुट या गाळेधारकाने बाबासाहेबांच्या नावावर आपले शेड उभारले आहे. त्यामुळे नाव दिसत नाही. सदर अतिक्रमण हे बाबासाहेबांच्या नावाची विटंबना करत असल्याने हे निषेधार्थ आहे. पालिकेला विनंती आहे. की सदर अतिक्रमण तातडीने काढून नाव मोकळे करण्यात यावे. तसेच सदर नाव हे ठळक अक्षरात रंगविण्यात यावे. सदर अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास आंबेडकरी समाज सोबत घेऊन तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात अतुल वानखेडे यांनी दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.