शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत बारा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण जखमी झाले. धुळ्याचे एसपी संजय बारकुंड यांनी सांगितले की, या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर गावात मंगळवारी सकाळी घडली. महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या डंपर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडकून बसस्थानकावर धडकली.
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.
मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...









