loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूलमध्ये विश्व जनसंख्या दिवस साजरा करण्यात आला.

Jul 12, 2023


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर, प्राचार्य मुकेश मिसर उपस्थित होते. इयत्ता पाचवी व इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. इयत्ता पाचवीच्या हर्ष भिवसने, नयनदास आरोही कोरपे, इयत्ता दहावीचा आदित्य सोनवणे यांनी आपले विचार मांडले.जागतिक लोकसंख्या दिन हा संयुक्त राष्ट्राचा एक उपक्रम आहे जो दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो त्याव्यतिरिक्त वाढत्या जागतिक लोकसंख्येबद्दल आणि पुनरुत्पादक आरोग्याच्या महत्व बद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे हा दिवस 1989 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला शिवाय लोकसंख्या वाढीमुळे हा दिवस 1987 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचा गव्हर्निंग कौन्सिल ने सुरु केला त्यावेळी जगाची वाढती लोकसंख्या निश्चितच संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनली होती. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र संघाने जास्त लोकसंख्येच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि आसपासच्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला महत्त्वाचे म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन मुख्यत्वाने जागतिक लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्याची गरज आणि महत्व यावर लक्ष केंद्रित करतो विशेष म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन हा जनजागृतीचा उत्सव आहे लोकसंख्येचा समस्यांबद्दल लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय लोकसंख्येच्या समस्यांमध्ये मानवी हक्क कुटुंब नियोजन आरोग्याचा अधिकार लैंगिक समानता बाल आरोग्य बालविवाह संक्रमित रोगांचे ज्ञान इत्यादी समावेश आहे मुली आणि मुले दोघांनाही सक्षम करण्यासाठी जग जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.एक जानेवारी 2022 रोजी जगाची लोकसंख्या सात अब्ज 86 कोटी 88 लाख एवढी होती 2023 पर्यंत हा आकडा आठ अब्ज 10 कोटी 86 लाख होण्याची शक्यता आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्या भारताची लोकसंख्या 140 कोटी 64 लाख 87 हजार एवढी आहे वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधन संपत्ती खूप ताण वाढला आहे ही निसर्ग संपदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे या विद्यार्थ्यांना सौ प्रतिभा पवार सिद्धार्थ पगारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भक्ती चौधरी तेजल दखणे या दोघींनी केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
.