loader image
[ays_poll id=7]

गंगाधरी येथील हनुमान मंदिर खैरनार वस्ती येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सभामंडपाचे भुमीपुजन संपन्न

Jul 12, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गंगाधरी येथील खैरनार वस्तीवरील हनुमान मंदिर येथे सभामंडप देण्यात आला. या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या वेळी शाल व पुष्पगुच्छ देत आमदार सुहास आण्णा कांदे यांचे स्वागत करण्यात आले. श्री विष्णू निकम सर यांनी या वेळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू असून 1200 कोटी रुपये निधी आमदारांनी खेचून आणला जे या आधी कोणत्याही आमदाराला शक्य झाले नसल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी बोलताना विकास कामांसाठी कोणतीही शंका मनात न ठेवता केंव्हाही मला सांगा मी आपल्या सेवेत हजर असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले. येथील ग्रामस्थांच्या मागणी नुसार येथील खैरनार वस्ती ते खैरे वस्ती, खैरे नगर अंतर्गत रस्ता व स्मशानभूमी चे काम लवकरच करून दिले जाईल असे आश्वासीत केले. आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राजकीय कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करायला संकोच करू नका, मी आपल्याला सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी श्री विष्णू निकम सर, डॉ.वाय.पी.जाधव, प्रमोद भाबड, गंगाधरी ग्रामपंचायतचे सरपंच निलेश खैरनार, दिगंबर भागवत, वसंतराव सोनवणे, नंदू खैरनार, सुनील जाधव, अशोक खैरनार , गणेश खैरनार , डॉ.मधूकर खैरनार, संदीप खैरनार, दीपक खैरनार, संजय खैरनार , वैभव खैरनार , बाळकृष्ण खैरनार, महेश इघे, सोपान जाधव, वसंतराव खैरनार, शिवाजी खैरनार महेंद्र गायकवाड, महेश ईघे,विजय ईप्पर, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन भगीरथ जेजुरकर यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.