loader image
[ays_poll id=7]

शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने धेतली पोलिस निरीक्षकांची भेट

Jul 12, 2023


मनमाड शहरातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने मनमाड शहर पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली.

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध समस्यांवर तात्काळ उपायोजना करणे कामी मनमाड शहराचे पोलीस निरीक्षक थोरात यांच्याशी शिवसेना शिष्टमंडळाने चर्चा केली. गेल्या अनेक दिवसापासून शहरात वाहन चोरी, चेन स्नाचींग, मोबाइल चोरीच्या घटनेत खुप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे, पार्किंग, वाहनाच्या कर्णकर्कश्श आवाज, वाहन जोरात चालवणे, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओ वर बारीक लक्ष देणे, अशा विविध समस्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्या बाबत चर्चा झाली.
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही फुटेज या आधारे चोरांच्या माहिती हस्तगत करणे, चोरीच्या घटनांचा लवकरात लवकर तपास लावणे, रोडरोमिओंवर तत्काळ कारवाई करणे तसेच विविध उपाय योजना करणे या विषयांवर शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक थोरात यांच्याशी चर्चा केली.
सविस्तर चर्चेनंतर शहर पोलिस स्थानकातर्फे सर्व उपायोजना तात्काळ राबविल्या जातील, गस्त वाढविल्या जाईल तसेच शहरातील या सर्व समस्यांवर बारीक लक्ष ठेवले जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, लोकेश साबळे, युवासेना उपशहरप्रमुख मन्नू शेख, ऋषिकांत आव्हाड, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.