loader image
[ays_poll id=7]

मल्हारवाडी ( ता. नांदगाव ) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. सारिका संदीप जेजूरकर

Jul 14, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.सारिका संदीप जेजुरकर यांची आज बिनविरोध निवड झाली…आवर्तन पद्धतीने ठरल्यानुसार सौ.सुनंदा बळीराम झेंडे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता..राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलविण्यात आली होती..या सभेत सरपंचपदासाठी सौ.सारिका जेजुरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला..निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही.के.ढवळे यांनी सौ.सारिका जेजूरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले..त्यांना ग्रामसेवक अतुल सोनवणे, कर्मचारी कृष्णा बावणे यांचें सहाय्य लाभले..या विशेष सभेस उपसरपंच दिपक खैरनार, ग्रामपंचायत सदस्या चित्रा ईघे, अश्विनी खैरनार, मीना गोविंद, सरला काकळीज, शोभा पिठे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आदी उपस्थित होते…या निवडीनंतर ढोल ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला..आमदार सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी अंजुम कांदे, फरहान खान यांनी या निवडीबद्दल स्वागत केले..यावेळी मधुकर ईघें, भागिनाथ गोविंद, शांताराम वाघ, वाल्मीक काकळीज, मुकुंद खैरनार, भाऊसाहेब पिठे, बाळासाहेब महाजन, जयराम मोकळ, सचिन रोहम, युवराज सोनवणे, आबासाहेब खैरनार, रवींद्र आहेर, दिपक खैरनार, विठ्ठल पानसरे, भारत जेजुरकर, पोपट जेजुरकर, गणेश जेजूरकर, समाधान खैरनार, राजू खैरनार, अंबादास जाधव, जीवन खैरनार, योगेश गेजगे, संजय गोरे, संतोष आहेर, सुनील भवर, गोलू घोडके, पवन खैरनार, जयेश खैरनार, गोरख महाजन, चंद्रभान गोविंद आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.