loader image
[ays_poll id=7]

कायद्यामुळे सर्वांना समान संधी – न्या. खराडे

Jul 18, 2023


मनमाड – आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कायद्याची निर्मिती करण्यात आली असून त्यामुळे सर्वांना विकासाची समान संधी मिळते; असे प्रतिपादन मनमाड येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश महेशकुमार खराडे यांनी केले. येथील संत झेवियर हायस्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती व वकील बार संघ मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षीय भाषणातून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना,मनमाड वकीलबार संघाचे अध्यक्ष एडवोकेट किशोर सोनवणे, सचिव एडवोकेट शशिकांत व्यवहारे, खजिनदार एडवोकेट संजय गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. हेमंत वाले यांनी केले तर सूत्रसंचालन एडवोकेट श्री शशिकांत व्यवहारे यांनी केले. या शिबिरात श्री.किशोर सोनवणे, श्री. शशिकांत व्यवहारे व श्री.संजय गांधी यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून मुलांच्या हक्कांबद्दल त्यांच्या वरील होणाऱ्या अत्याचाराबद्दल व त्या अनुषंगाने प्रतिबंधक कायद्याबद्दल विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. मुख्याध्यापकांनी सदरहू उपक्रमाचे आपल्या भाषणातू कौतुक करून या प्रबोधन कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कारही केला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.