loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयातील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची एम.पी.एस.सी. मार्फत कर सहाय्यक व मंत्रालयात महसूल सहाय्यक पदांसाठी निवड

Jul 22, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड मधील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक व महसूल सहाय्यक पदांसाठी निवड झाली. ही महाविद्यालयाच्या दृष्टीने व संस्थेच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहेत. रोहित या विद्यार्थ्याने महाविद्यालयातून 2016 या वर्षी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयात असतानाच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याची आवड तयार झाली होती. रोहित राजेंद्र दंडगव्हाळ हा विद्यार्थी मनमाड शहरातील असून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर रोहित या विद्यार्थ्याने पुणे या ठिकाणी क्लास करून परत आपल्या मूळ गावी येऊन घरीच अभ्यास करून या पदांना गवसणी घातली. महाविद्यालय मार्फत रोहित राजेंद्र दंडगव्हाळ या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम सर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यापुढेही न थांबता राज्यसेवा परीक्षा देऊन वरील पदावरती नियुक्ती होण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समन्वयक प्राध्यापक डाॅ. गणेश गांगुर्डे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. बी.एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या ज्योती पालवे मॅडम, वरिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक फड सर, वाणिज्य विभागातील प्राध्यापिका डॉ. आरती छाजेड, प्राध्यापक मुसळे सर, प्राध्यापक नजरधाने सर, महाविद्यालयातील लेखापाल श्री प्रशांत सानप सर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.