loader image
[ays_poll id=7]

आ.सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व २० लक्ष रुपये निधी मंजूर

Jul 27, 2023


आ.सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व २० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला.
या निधीतून येवला रोड ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन आज युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांचे हस्ते संपन्न झाले
यावेळी व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विष्णू निकमसर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप सरपंच सौ.सारिका जेजुरकर, उपसरपंच दीपक खैरनार, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते..
यावेळी विष्णू निकम यांनी आपल्या मनोगतातून आ. सुहास आण्णा कांदे यांच्या दातृत्वाविषयी माहिती देतांना सांगितले की, आ.सुहास आण्णा कांदे हे विविध विकास कामांसाठी कुठलाही भेदभाव न करता भरघोस निधी उपलब्ध करून देत असतात. आतापर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
प्रास्ताविकात राजाभाऊ जगताप यांनी मल्हारवाडी गावात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भविष्यातही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी केली.. मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येवला रोड ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी खैरनार, सुनंदा झेंडे, शोभा पिठे, दिगंबर भागवत, अरुण भोसले, मधुकर ईघे,वाल्मीक काकळीज, भागिनाथ गोविंद, भाऊसाहेब पिठे, नंदू परदेशी, बापू ईघे, आबासाहेब खैरनार, चंद्रभान गोविंद, जयराम मोकळ, प्रकल्प पाटील आदींसह मल्हारवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकल्प पाटील यांनी तर आभार संदीप जेजुरकर यांनी मानले..


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.