loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठा

Aug 1, 2023


नांदगाव

शहरातील आनंदनगर भागात आज गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी  नांदगाव- संभाजीनगर रोडवर रास्ता रोको केला होता.. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन मोठ्या संख्येने  नांदगाव नगरपरिषद कार्यालयावर  मोर्चा काढला .

सोमवारी सकाळी आनंदनगर भागात गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी  नांदगाव- संभाजीनगर रोडवर सकाळी ८ / ३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आनंदनगर येथून मोर्चाला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गाने  संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन शेकडोच्या संख्येने नांदगाव नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी
मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते.त्यामुळे गढूळ पाणी आले आहे. आपल्याला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल. लवकरच नांदगाव शहरासाठी जलशुद्धीकरण केद्र उभारण्यात येणार आहे. तसेच शहरासाठी  पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या मोर्चात माजी नगरसेवक अरुण साळवे, अनिल जाधव,विश्वास अहिरे, नितीन जाधव, अँड सचिन साळवे, मनोज चोपडे, अविनाश केदारे, सचिन पगारे, डी. एन.कटारे, दिपक अंभोरे, विश्वास आहिरे, मनोज चोपडे, ॲड.विद्या कसबे, आक्काबाई सोनवणे,शोभा देवकाते,कमल आहिरे आदींसह शेकडो महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.