loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ( NEP)2020 व्याख्यान संपन्न

Aug 4, 2023


मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाणीव जागृती सप्ताह निमित्त व्याख्यानाचे तिसरे पुष्प महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख डॉ. जे.वाय. इंगळे यांनी आपल्या मनोगतातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आकृतीबंध विद्यार्थी व प्राध्यापकांना समजावून सांगितला या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय व समन्वय दृष्टिकोन, मातृभाषेतून शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळे व्यतिरिक्त शिक्षण देण्याची व्यवस्था, शिक्षकांना संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी तसेच दहावीची बोर्ड परीक्षा समाप्ती यासारख्या ठळक मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता व आवश्यकता तसेच विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हे धोरण उपयुक्त आहे असे मत त्यांनी व्यक्त केले हे धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास परिणामी तो देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे या धोरणाला यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांना उचलावी लागणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, ज्येष्ठ प्रा. डॉ. जे.डी वसईत, डॉ. आर. डी. भोसले, महाविद्यालयातील सर्व प्रा. उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ प्रा. डॉ. जे.डी वसईत यांनी केले आभार प्रा. गणेश गांगुर्डे यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.