loader image
[ays_poll id=7]

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्राच्या रंगमंचाचे उद्घाटन

Aug 5, 2023


मनमाड – “मनमाड शहरात सांस्कृतिक चळवळीची पुन्हा पायाभरणी करण्यासाठी ‘साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्र’ ह्या भव्य रंगमंचाचे उद्घाटन करताना आपणास मनस्वी आनंद होत आहे. पुढील महिन्यात या मंचावर जिल्हा पातळीवरील एकांकिका स्पर्धांचे आयोजन करून लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंचा खऱ्या अर्थाने कृतीशील वारसा चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे प्रतिपादन सागर आर्टचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक हिरामण मनोहर यांनी केले.
न.प. इमारतीमधील महात्मा फुले वाचनालय अभ्यासिका प्रांगणात जनहित विकास संस्थेने लोकवर्गणीतून साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्र म्हणून उभारलेल्या भव्य अशा रंगमंचाच्या उद्घाटनप्रसंगी हिरामण मनोहर बोलत होते. अध्यक्षस्थानी मनमाड बचाव समितीचे पुंडलिक कचरे होते.
“आज राजकारणासह सर्वच क्षेत्रात वाढलेल्या दूषित- कलुषिततेचा निचरा होऊन सर्व क्षेत्रे प्रवाहित होण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्र वाढीस लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच जनहित विकास संस्थेने साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्राची निर्मिती केलेली असून मनमाडमधील मुला-मुलींसह प्रौढ कलाकारांना टी.व्ही.वर देखील झळकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे,” अशी माहिती सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते शाहीर अशोकआप्पा परदेशी यांनी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अलका महाजन, सुषमा तिवारी, नरेंद्र कांबळे, कृष्णा पगारे, राजू लहिरे यांनीही आपापली मनोगते व्यक्त केली. यावेळी सागर आर्ट फिल्मच्या लघुपटातील दिग्दर्शक राजू लहिरे ,अभिनेत्री सीमा चौधरी, सिनेकलाकार अनिल पगारे, चेतन थोरात, सुरेश अहिरे, अक्षय गोसावी, संतोष परदेशी या सिनेकलाकारांचा उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत रमेश खरे यांनी तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उपाली परदेशी व मनोज गांगुर्डे यांनी केले. पुष्पक खरे, सूर्यकांत राजगिरे, मोतीराम भालेराव, बी.टी.पद्मने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. रश्मी मोरे,लीला राऊत, सुनीता महाले, शमशाद सय्यद,सुवर्णा निकम, रामदास पगारे,बबीता चिंडालिया, सुनिता राजगिरे, आर.बी. ढेंगळे, यशवंत बागुल, महेश दारुंटे, अर्जुन साळवे,मधुकर मोरे, आहिरे दादा आदींनी सहभाग दिला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.