loader image
[ays_poll id=7]

दरेगाव येथे मोराला जीवदान

Aug 6, 2023


गोरक्षनाथ लाड
दरेगाव- चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे विहिरीत पडलेल्या जखमी मोराला शेतकरी व ग्रामस्थांनी जीवदान देऊन पुढील प्रथमोपचार करण्यासाठी वनविभाग यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले.
दरेगाव गावालगत बंधार्या जवळ दादाजी निवृती गांगुर्डे यांच्या शेतातील विहिरीजवळ सायंकाळच्या सुमारास अन्न पाण्याच्या शोधात असताना मोर विहीरीच्या कठड्या वरून जात असताना विहिरीत पडला.हे दृश्य विहिरीच्या थोड्या अंतरावरून शेतात जात असताना येथील शेतकरी विष्णू जाधव यांनी पाहिले.मोर विहिरीच्या बाहेर का येईना म्हणून विहिरीवर जाउन पाहिले असता मोर विहिरीच्या पाण्यात पडल्याचे दिसून आले.जाधव यांनी उशीर न करता विहीर मालक दादाजी निवृती गांगुर्डे यांना ही हकीगत सांगितली. फोन करून आजुबाजुचे शेतकरी व ग्रामस्थांनी मोराला बाहेर काढण्यासाठी धावून आले.यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी मोर बाहेर काढण्याचे शर्यतीचे प्रयत्न करीत होते. मात्र विहीर 50 फुट खोल व पाणी असल्यामुळे तसेच अंधार पडू लागल्यानै मोराला बाहेर काढणे अवघड झाले होते.
यावेळी येथील तरूण वसंत आहिरे हे विहिरीत उतरून मोराला सुखरूप बाहेर काढले.यावेळी विष्णू जाधव,जालिंदर गांगुर्डे,भावराव गांगुड,समाधान आहेर रवींद आहेर,सिताराम आहिरे,आकाश आहिरे हे याप्रसंगी मदतीसाठी धावून आले.मोराला बाहेर काढताच मोर गारठून गेला होता.व जखमी असल्याने मोर चालण्याच्या स्थितींत नसल्यामुळे वसंत आहिरे यांनी मोराला आपल्या घरी जाऊन सुखरूप ठेवले.सकाळी मोराला सोडण्यासाठी गेले.असता त्याला चालता येईना.यावेळी वसंत आहिरे यानी वनविभाग यांना फोन व्दारे घटनेची माहिती दिली.
वनपरिक्षक अधिकारी संजय वाघमारे,वनपरिमंडळ अधिकारी प्रकाश सोमवंशी,यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी पुनम साळवे,वनमजुर नामदेव पवार,वाहन चालक अशोक शिदे यांनी दरेगाव येथे तात्काळ भेट देऊन पुढील प्रथमोपचार करण्यासाठी चांदवड येथील कार्यालयात नेण्यात आले. यावेळी काळू आहिरे,वसंत आहिरे,मगेश आहिरे,सोमनाथ आहिरे,चैतन्य आहिरे,केदराज आहिरे आदिसह उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.