loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत कवी रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी

Aug 8, 2023


कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये कवी रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते.
कवी रवींद्रनाथ टागोर हे भारताचे एक थोर सुपुत्र बंगालमधील एका संपन्न सुविद्य घरात इसवी सन 1861 मध्ये रवींद्रनाथांचा जन्म झाला त्यांना लहानपणापासूनच निसर्गाची जबरदस्त ओढ होती त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले . त्यांना शाळेतील बंदिस्त वातावरण आवडत नसे. अगदी लहानपणापासून ते कविता करत असत.
रवींद्रनाथांच्या काव्य प्रतिभेने त्यांना जगविख्यात केले. रवींद्रनाथांच्या गीतांजली ला नोबेल पुरस्कार मिळाले. रवींद्रानी इतरही विपुल लेखन केले. शिक्षणाबद्दल रविंद्रांचे फार वेगळे विचार होते.कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता चौथीची हर्षाली इमले,अवनी खैरनार,टीया छाबरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता नववीचे सृष्टी सांगळे हिने आपले विचार मांडले. या विद्यार्थ्यांना सचिन बिडवे, सौ पंचशीला पगारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हर्षदा कुदळे वृंदा शर्मा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.