loader image
[ays_poll id=7]

बिगरसिंचनाचे आरक्षित पाणी लवकरात लवकर सोडावे – आमदार कांदे यांची मागणी

Aug 8, 2023


मनमाड शहराला पाणी पुरवठा करणेसाठी पालखेड डाव्या कालव्यातून आरक्षित बिगरसिंचनाचे आवर्तनाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार कांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
पत्राचा आशय असा नांदगांव मतदार संघातील मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण व परिसरात नैसर्गिकदृष्ट्या पर्जन्यमान होत नसल्यामुळे मनमाड शहराचा पाणी पुरवठा हा नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाच्या डाव्या कालव्यात दर वर्षी सुमारे ३५५ द.ल.घ.फुट बिगरसिंचन पाण्याचे कायम स्वरूपी आरक्षण असलेल्या पाण्यावर अवलंबून आहे. यापूर्वी देखील डाव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या बिगरसिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून मनमाड शहराला २० ते २२ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत वागदर्डी धरणात १५ ते २० दिवस पुरेल इतेकाच पाणी साठा असल्याने शहराला पाणी टंचाई निर्माण होवू नये याकरिता वागदर्डी धरणात आवर्तन ‘सोडण्यासाठी मा. कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांना पत्र क्र. १७९९/२०२३ दि. २१/०७/२०२३ आणि जा.क्र.१८८९/ २०२३ दि. ३१/०७/२०२३ द्वारे कळविण्यात आले आहे. परंतु बिगरसिंचनाचे आवर्तनाचे पाणी माहे ऑगस्ट २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात मिळणार असल्याचे संकेत मिळत असल्याने मनमाड शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी मनमाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आरक्षित केलेले बिगरसिंचन पाण्याचे आवर्तनाचे पाणी लवकरात लवकर सोडण्यासाठी संबंधितांना आदेश करण्यात यावे अशी विनंती आमदार कांदे यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

नाशिक,येवला,दि.१३ जानेवारी :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ...

read more
बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या  मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व...

read more
रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या...

read more
.