loader image
[ays_poll id=7]

पाणी चोरी करतांना आढळल्यास होणार कडक कारवाई – वैभव भागवत

Aug 11, 2023


मनमाड शहरासह मनमाड रेल्वे स्थानक, आंबेगाव ग्रामपंचायत, येवला शहर आणि तालुक्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले आहे. सदर पाणी बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्यालगत कोणी जर पाणीचोरी करतांना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिला आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून शासनमान्य असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी बिगरसिंचनचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यात मनमाड पाणी पुरवठा योजना, मनमाड मध्य रेल्वे पाणी पुरवठा योजना, आंबेगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना, येवला शहर पाणी पुरवठा योजना, येवला तालुका ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धरणात पाण्याचा येवा कमी असल्याने पालखेड डाव्या कालव्यावरील बिगरसिंचन संस्थांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हे आवर्तन बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्या लगत असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांनी या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करून पाणीचोरी करू नये. अशा स्पष्ठ सूचना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहे. पाणी चोरी करतांना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

नाशिक,येवला,दि.१३ जानेवारी :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ...

read more
बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या  मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व...

read more
रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या...

read more
.