loader image
[ays_poll id=7]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्या संदर्भात रिपाइंचे शहराध्यक्ष महाविर जाधव यांचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन.!

Aug 14, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही तमाम आंबेडकरी अनुयायी यांची फार वर्षांपूर्वीची मागणी आहे.

सविस्तर वृत्त असे की मुख्य नांदगाव शहरातील बाजार पेठेत प्रवेश करतांना समोरच सिंबॉल आॅफ नॉलेज,द ग्रेटेस नंबर वन इंडियन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र दर्शन होते शहरातील प्रवेश मार्गालाच सुंदर आकर्षक भव्य-दिव्य अशी सुशोभीकरण करुन पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही मागणी अनेक वर्षांपासून नांदगाव शहरातील आंबेडकर अनुयायी यांची प्रलंबित आहे मनमाड येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्याच पद्धतीने नांदगाव शहरातील नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले तसेच शिवसृष्टी मोठ्या प्रमाणात जलदगतीने काम चालू आहे. नांदगाव शहरात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक थोर महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू असुन अहिल्यादेवी होळकर यांचे देखील पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम चालू आहे याच पद्धतीने बौध्द समाजातील बांधवांचा देखिल आनंद द्विगुणित व्हावा यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पूर्णा कृती पुतळ्याचे काम लवकर व्हावे,ही समस्त आंबेडकरी जनतेची मागणी आहे.असे निवेदन आज रिपाइंच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे व लवकरात लवकर आमच्या मागणीला न्याय मिळाला अशी अपेक्षा व्यक्त करुन रिपाइंच्या वतीने विनंती करण्यात आली आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव,गौतम काकळीज प्रशांत गरूड,किरण पवार, सोहेल रंगरेज,राज पवार, दिपक मोरे,जफर शेख, सोमनाथ चौधरी,निलेश जाधव यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.