loader image
[ays_poll id=7]

सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Aug 19, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे प्रत्येक वर्षी न. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शालेय साहित्याचे वाटप करत असतात.
नांदगाव न. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शिवनेरी विश्राम गृह येथे सौ.अंजुम ताई कांदे यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क आहे पण त्यासाठी त्याला वातावरणही तसेच पाहिजे म्हणून लवकरच सर्व विद्यार्थ्यांना नूतन शाळा इमारत पाहायला मिळणार असल्याचे सांगितले.
सौ. अंजुमताई कांदे यांनी मागील वर्षी सर्व शाळांची पाहणी केली होती .या पाहणी दरम्यान सर्व शाळांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय दयनीय असल्याचे त्यांच्या लक्षात आले सदर बाब त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांना सांगितल्यानंतर तात्काळ नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळांकरिता दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते या सर्व शाळांची काम प्रगतीपथावर असून बहुतेक शाळांची कामे पूर्णत्वाकडे आहे.
आज नांदगाव येथील गांधीनगर न प शाळेचे सुरू असलेल्या कामावर सौ अंजुमताई यांनी भेट दिली असता कामाची पाहणी केली.
याप्रसंगी सौ.अंजुमताई कांदे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उज्वलाताई खाडे, तालुका प्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे,
तसेच न.प.शाळेचे शिक्षक राजेंद्र मोरे, शाहिद अख्तर, दीपक मोरे , गंभीर त्रंबक अहिरे, नगर पालिकेचे गणेश पाटील, व इतर मराठी व उर्दू माध्यमाचे शिक्षक वृंद उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजेंद्र मोरे सरांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.