loader image
[ays_poll id=7]

जामदरी येथील आदिवासी कुटूंबीयाना संसारोपयोगी वस्तू भेट

Aug 20, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

तालुक्यातीता जामदरी येथील आदिवासी वस्तीवरील मागील वर्षभरात विविध घटनांमध्ये आदिवासी कुटुंबीयांचे संसार उध्वस्त झाले होते, यामागे विविध कारणांमुळे जळीत घटना होऊन संसार नष्ट झाला होता.
आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांनी आज सर्व कुटुंबियांना निवस्थानी पाचारण केले होते. या वेळी उपस्थित सर्व आदिवासी कुटुंबियांना सर्व प्रकारच्या संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. या मध्ये सर्व लहान मोठी भांडे, कुकर, गॅस शेगडी, किराणा, गहू, तांदूळ, 2 साड्या, ड्रेस या वस्तूंचा समावेश आहे.
सर्व आदिवासी कुटुंबीयांचा पाहुणचार करून आदराने सर्वांना संसार उपलब्ध करून देण्यात आला.
आमदार सुहास आण्णा कांदे सतत नैसर्गिक आपत्तीचा मध्ये नुकसान झालेल्या कुटुंबियांना संपूर्ण संसार उभा करून कुटुंबप्रमुखाची जबाबदारी निभावत असतात.
या वेळी किरण गवळे व भगवान देशमुख यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे जामदरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहानदादा खान, प्रमोद भाबड, किरण आण्णा कांदे, भावराव बागुल, किरण देवरे, शहर प्रमुख सुनील जाधव, उज्वालाताई खाडे, रोहिणी ताई मोरे, दीपक मोरे, रमेश मामा काकळीज, सरपंच बाबासाहेब मोरे, भगवान देशमुख, हिरालाल देशमुख, अरुण शेवाळे, कमलेश इनामदार, संतोष म्हस्के, किरण गवळे, लखा पवार, सुरेश चव्हाण तसेच

लाभार्थी सुरेश घुटे, शिवाजी वटाने, दत्तू घूटे, सोमनाथ घुटे, शारदाबाई सुभाष घुटे, छायाबाई दौलत वाघमारे, अनुसाबाई देवराम सोनवणे, सुदाम पवार, देविदास चव्हाण, वाल्ह्याबाई दळवी, छोटू मोरे तसेच रणखेडा येथील अनिल मोरे आदी उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.