भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक
बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...










