loader image
[ays_poll id=7]

मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी समाजात आपला स्टेटस निर्माण करावा : श्रीमती विजया हंडोरे

Sep 5, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनानिमित्त महिला विकास कक्ष व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती विजया हंडोरे यांचे शिक्षण व शिक्षक या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक विद्यार्थ्यांना विधायक मार्गाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात तसेच संपर्क माध्यमांचा वापर विधायक कार्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले विद्यार्थ्यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा समाजात आपला स्टेटस निर्माण करावा असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या क्षमता ओळखून शिक्षणामध्ये वाटचाल केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी मित्रांचे मूल्यमापन करूनच भविष्याची वाटचाल केली पाहिजे, विद्यार्थ्यांनी कुटुंबाप्रती आपली जबाबदारी व समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ.जे. वाय.इंगळे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. आर.डी.भोसले तसेच वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मिलिंद अहिरे सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कविता काखंडकी यांनी केले,सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. विष्णू राठोड यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. आरती छाजेड यांनी मानाले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.