loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

Sep 7, 2023


येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केजी विभागातील विद्यार्थी राधा कृष्णाच्या वेशात आले होते .प्राचार्य मुकेश मिसर. प्राथमिकचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात जणू काही गोकुळच अवतरले होते. मुलांनी अतिशय उत्साहात व जोशात डान्स करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला .केजी विभागातील विद्यार्थी आनंदी सरोवरे .आर्यन खाजिकर. ईशान मिसर. आदिनाथ सारुकते. अवनी बिलाडे. अर्णव बिडगर. अवनी आव्हाड .दर्शनी चोरमले . विवांश वडनेरे .वैदेही दीक्षित. हे विद्यार्थी राधा कृष्णाच्या वेशभूषेत आलेले होते.
सौ संगीता कदम देसले यांनी कृष्ण जन्माष्टमी विषय विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. अर्णव भावसार याने शिव तांडव स्तोत्रम म्हटले. भाग्येश बरड याने “सुखके सब साथी दुख मे ना कोई मेरे राम तेरा नाम एक था दूजा ना कोई “हे गीत गायले. अक्षता शिनाकर. अक्षता प्रजापत.आराध्या सांगळे. या मुलींनी “अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभम” हे गीत गायले. संगीत शिक्षक सचिन बिडवे यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे आयोजन केजी शिक्षिका सौ .अर्चना संसारे.सौ. विनिता उबाळे. सौ. ज्योति क्षीरसागर सौ .रसाळ सौ. शाकादिपी .सौ .लहाने सौ.बनकर व श्री विशाल झालटे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल असे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती गायत्री मिश्रा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.