loader image
[ays_poll id=7]

माणिकपुंज गणेशनगर येथील जळीतग्रस्त कुटूंबीयांना आ. सुहास कांदे यांचेकडून मदत

Sep 8, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गणेशनगर येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना आ. सुहास कांदे यांच्या तर्फे संसारोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. याबाबत अधीक माहीती अशी की तालुक्यातील माणिकपुंज गणेशनगर येथे काही दिवसापुर्वी जळीत घटना घडली होती, धर्मा लक्ष्मण मेंगाळ, सुनील धर्मा मेंगाळ, सुरज धर्मा मेंगाळ या तीन कुटुंबीयांचे झोपडीचे जळीत झाले होते, या घटनेत संपूर्ण संसार जळून खाक झाला होता तर 2 जनावरांचा मृत्यू देखील झाला होता.
या सर्व घटने बाबत आमदार प्रतिनिधी भाऊराव बागुल यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांना माहिती कळवली असता आज तातडीने या कुटुंबियांना निवासस्थानी बोलावण्यात आले. याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे, सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते या कुटुंबीयांना गृहउपयोगी संसार भेट देण्यात आला यामध्ये गहू, तांदूळ,किराणा, कपडे सर्व भांडे,गॅस कुकर या वस्तूंचा समावेश आहे.
या प्रसंगी विष्णू निकम सर, किरण देवरे, प्रमोद भाबड, सुनील जाधव, सरपंच विष्णू मेंगाळ,कचरू मेंगाळ,विजय चव्हाण, गणेश मोहिते, सदाशिव मेंगाळ,जयराम मेंगाळ, रामभाऊ गिरी, ठकाजी मेंगाळ, साईनाथ रामकर, अशोक कोल्हे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.