loader image
[ays_poll id=7]

पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी मोर्चा

Nov 7, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आधारवड महिला बाहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
संस्थेच्या वतीने पंचायत समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले असून यामध्ये म्हटले आहे की, की आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचारी म्हणून काम करतो आहे. आम्हाला अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन दिले जात असून ते देखील वेळेवर मिळत नाही. आम्हाला मिळणाऱ्या मानधनाच्या मोबदल्यात आम्ही शालेय पोषण आहार व्यतिरिक्त शाळेतील इतर कामे करतो मात्र त्याबद्दल आम्ही कधीच काही तक्रार केलेली नाही मात्र आमच्या सारख्या ग्रामीण भागातील महिलांना कामाच्या मोबदल्यात मिळणारे मानधन अगदी तोकडे आहे त्यामुळे आम्हाला राज्य सरकारने मानधन वाढवून द्यावे यासह राज्य सरकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कर्मचाऱ्यांना किमान २० हजार वेतन देण्यात यावे. चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी. सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी. थकीत इंधन बिल व मानधन दर महिन्याला देण्यात यावा. कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये. त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये.दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे. तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासना नुसार दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी तसेच दिवाळी बोनस लागू करण्यात यावे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण कवच द्यावे तसेच अपघाती विमा संरक्षण द्यावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी संगीता सोनवणे, वैशाली वाघ, विमल वाघ, संगीता निकम, शैला पवार, सुनिता राठोड, लंका पवार, वनिता डोंगरे,पुंजाबाई पवार यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.