loader image
[ays_poll id=7]

सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी साठी उपोषनाचा दुसरा दिवस

Nov 8, 2023


नांदगाव : (मारुती जगधने)नांदगांव येथील राष्ट्रवादी(एस पी) गटाचे उपोषन मागे घेण्यात आले त्याच दिवसी दि ७ पासून राष्ट्रवादीच्या( एपी) गटाचे उपोषन सुरु होऊन दोन दिवस झाले उपोषन सुरु आहे .
असे विरोधीगट व सत्ताधारी गट या दोन्ही गटांनी उपोषन केले आता राष्ट्रवादीच्याच
सत्ताधारी गटाने नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी उपोषन सुरु केले.

नांदगाव तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी नांदगाव येथील नविन तहसील कार्यालया जवळ राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी अजित पवार गटाचे बेमुदत उपोषण आज सुरू करण्यात आले.या वेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस होऊनही प्रशासनाच्या निष्काळजीपणाने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालूक्यात समावेश न करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. शासनाने त्वरीत नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. गुरांसाठी चारा छावण्या, मागिल वर्षी झालेल्या अतिवृष्टी व गारपीटीचे अनुदान जाहीर करावे अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे नांदगाव तालुकाध्यक्ष विजय चव्हाण पाटील, विनोद शेलार, अमित बोरसे,सोपान पवार, राजेंद्र लाठे, दत्तू पवार, देवदत्त सोनवणे,अतुल पाटील,घनश्याम सुरसे, अशोक पाटील, जगदीश सुरसे, विश्वनाथ बोरसे, शंकर शिंदे, शुभम बोरसे, सुशील आंबेकर, उमाकांत थेटे, रामसिंग पिंगळे,दत्तात्रय निकम, विजय आहेर, खंडू थेटे, प्रवीण मोहिते, वाल्मिक टिळेकर,चंद्रकला बोरसे,सुगंधा खैरनार, यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.