loader image
[ays_poll id=7]

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम ६ दिवसात फुकट्याकडुन ३ कोटी ७३ लाख दंडाची वसुली

Nov 16, 2023


नांदगांव : मारुती जगधने
रेल्वेच्या तिकीट तपासणी विभागाने फक्त सहा दिवसात प्रवासी तिकिट तपासणी मोहीम राबविली असता त्या ४१८९४ फुकट्या प्रवाशाकडुन तब्बल ३ कोटी ७३:लाख रुपये दंडाची वसुली करुन एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून या कमी रेल्वे विभागाचे भुसावळ डिव्हीजनचे ५३७ कर्मचारीनी हे मिशन पार पाडले शिवाय तिकीट तपासणी मोहीम नियमित करण्यात आली आहे .भुसावळ
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागाचे ५३७ तिकीट तपासणी कर्मचारी यांनी दिनांक ९/११/२०२३ ते दि. १५/११/२०२३ पर्यंत भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून भुसावळ विभागाचा नवीन विक्रम प्रस्थपित केला आहे .
परिणाम स्वरूप विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ४१८९४ प्रकरणांतून एकूण रु. ३. ७३ करोड रुपये दंड वसूल करण्यात आला.
ह्या मोहिमेच्या परिणाम स्वरूप दिनांक ११/११/२०२३ रोजी भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण ७ हजार ३७० प्रवाश्यांकडून एकाच दिवसी एकूण ६८लाख ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सर्व अधिकृत रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, भुसावळ विभागात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, सुविधा ट्रेन्स , विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे कार्य करण्यात येते.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.