loader image
[ays_poll id=7]

नांदगांव दुष्काळात पाण्याचा सुकाळ की नासाडी ?

Nov 23, 2023


नांदगांव : मारुती जगधने
यावर्षी खरीप व रब्बी हंगामा पाण्यावाचून गेला अखेर दुष्काळी परिस्थिती मुळे नांदगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असतांना शहरा नजीक गिरणानगर ग्रामपंचायत अंतर्गत दुर्लक्षामुळे दि. २१ रोजी रात्रीपासून सकाळपर्यंत नळांना १५ तास हजारो लीटर पाणी वाया गेल्याने परीसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.हे पाणी ५६ खेडीचे असल्याचे समजते
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव – साकोरा रस्त्यावर असलेल्या गिरणानगर ग्रामपंचायत अंतर्गत गिरणा नगर,मापारी वाडा,तसेच दत्त वाडा आदि
ठिकाणी ५६ खेडी योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो.मात्र यावर्षी पाऊस न झाल्याने विहीरी तसेच बोअरवेल कोरड्याठाक पडल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे वरील परीसरात तब्बल २२ दिवसांनंतर सोमवारी नळांना पाणीपुरवठा झाला होता.

पुन्हा मंगळवारी रात्री १ वाजता अचानक सर्व नळांना पाणीपुरवठा सुरू झाला.मात्र रात्रभर कोणाच्या लक्षात न आल्याने बुधवार दुपारपर्यंत नळांना पाणीपुरवठा सुरू होता त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेल्याने अनेक घरांच्या अंगणात तसेच पाण्याच्या टाकीच्या आवारात पाणी साचल्याने पावसाळ्याचे स्वरूप आले होते.त्यामुळे अजून काही ठिकाणी महिन्यानंतरही पाणीपुरवठा झालेला नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.सबंधित विभागाने तालुक्यात तसेच ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन करून बावीस दिवसाआड ऐवजी आठ दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी करण्यात येत आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.