loader image
[ays_poll id=7]

गारपीट ग्रस्त भागाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाहणी…*

Nov 30, 2023


मनमाड सह नांदगाव तालुक्यातील अचानक गारपीठी पावसामुळे नुकसान झालेल्या मनमाड जवळील नगरचौकी शिवार, कॅम्प परिसर, ट्रेनिंग कॉलेज, अनुकवाडे शिवार येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेती प्रत्यक्षात पाहणी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने त्यांचे सांत्वन करण्यात आले. जमीनदोस्त झालेल्या पीक दाखवत शेतकरी बांधवांनी टाहो फोडीत आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी मनातील वेदना सांगितल्या. या संदर्भात तहसीलदार श्री. सिध्दार्थ मोरे यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा करून ग्रामसेवक,तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या समवेत महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी यांनाही प्रत्यक्षात आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे. जेणेकरून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण होऊन शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल ,शिवाय कुठल्याही शेतकरी बांधवांवर अन्याय न होता पारदर्शक पंचनामे होऊन प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाला न्याय मिळेल.
शासनाने तातडीने नुकसान भरपाई लवकर द्यावी , यासाठी आपण स्वतः तत्परतेने पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी हावलदील झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ग्वाही दिली. या अनुषंगाने गारपिटीमुळे शेतामधील उभे असलेले विद्युत खांब कोसळल्याने त्याचबरोबर डीपी मध्ये नुकसान झाल्याने अनेक शेतातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे एम एस ई बी च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने युद्धपातळीवर हे काम सुरू करून विद्युत पुरवठा पूर्ववत करावा म्हणून एम एस ई बी चे अधिकारी अभियंता यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी गणेश धात्रक यांच्या समवेत प्रशासनाचे तलाठी जोपूळे साहेब, शिवसेना नांदगाव विधानसभा संपर्क प्रमुख शिर्के सर, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद,शहर प्रमुख माधव शेलार, सामाजिक कार्यकर्ते पिंटू मामा कटारे, प्रकाश बोधक, राजू मामा सांगळे,राहुल सांगळे, अम्राळे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.