loader image
[ays_poll id=7]

मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Dec 6, 2023


नाशिक – रेल्वे प्रशासनाने नव्याने आखलेल्या रेल्वे गाड्यांच्या टाईमटेबलमुळे नाशिकसह मनमाडकरांवर मोठा अन्याय झालेला आहे. मनमाडपर्यंत असलेल्या दोन रेल्वेगाड्यांना प्रशासनाने धुळे आणि नांदेड पर्यत एक्सटेंशन दिल्याने मनमाडहून नाशिक आणि मुंबईकडे तसेच मुंबई आणि नाशिककडून मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांसह चाकरमान्यांची मोठी कुचंबणा होत आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत मनमाड – मुंबई या दोन शहरांना जोडणारी रोजच्या साठी म्हणूून स्पेशल ट्रेन सुरू करण्याची आग्रही मागणी केली.

धुळे आणि नांदेड जिल्हावासियांच्या तगादया पुढे झुकून काही माहिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मनमाड साठी असणाऱ्या दोन्ही गाड्यांना पुढे एक्सटेंशन दिले आहे. यामुळे या रेल्वे गाड्यांवर आता धुळे आणि नांदेड येथील प्रवाशांचा मोठा हक्क झाला असून नाशिक आणि मनमाड येथील प्रवाशांवर अन्याय झाला आहे.नासिक येथून मनमाडला ये- जा करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या रोज हजारोंच्या घरात आहे. रेल्वे प्रवाशांच्या वरील निर्णयामुळे चाकणनामे त्रस्त झाले आहे. नासिक आणि मनमाड येथील रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई ते मनमाड यादरम्यान रोज धावणारी स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील रेल्वे प्रशासनाकडून खासदार गोडसे यांच्याकडे होत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन आज खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत जात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. सीएसटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनल येथून मनमाडला जाणाऱ्या दोन्ही गाड्यांना पुढे धुळे आणि नांदेड पर्यंत एक्सटेंशन दिल्याने नाशिक आणि मनमाड येथील रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाडीत बसण्यास जागाच मिळत नाही. मनमाड पर्यंत जाणाऱ्या दोघा रेल्वे गाड्यांना धुळे आणि नांदेड पर्यंत एक्सटेन्शन दिल्याने नाशिक ते मनमाड रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कुंचबना होत आहे. या परिस्थितीवर मात करून नाशिक, मनमाड येथील प्रवाशांना दिलासा देण्यासाठीमनमाड -मुंबई या दोन शहरांना जोडणारी रोजच्या साठी म्हणूून स्पेशल ट्रेन सुरू करण्याची आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.


अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.